११ वर्षांच्या प्रेमसंबंधाचा भीषण शेवट: विवाहाच्या आधीच प्रियकराचा प्रेयसीवर चाकू हल्ला
मुंबईतील विरार येथे एक धक्कादायक घटना घडली. ११ वर्षांपासून प्रेमसंबंधात असलेल्या तरुणाने संशयातून आपल्या प्रेयसीवर चाकूने हल्ला केला. डिसेंबर महिन्यात दोघांचे लग्न ठरले होते, मात्र त्याआधीच प्रियकराने धारदार शस्त्राने तिला गंभीर जखमी केले. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गास कोपरी गावात राहणारा अक्षय जनार्दन पाटील आणि २३ वर्षीय भाविका भालचंद्र गावड यांचे गेल्या…
