शिरपूर तालुक्यातील सांगवी नजीक चारणपाड्याला भीषण दंगल

झेप ब्रेकिंग : जागतिक आदिवासी दिनाचे लावलेले बॅनर फाडल्यावरून चारणपाड्यात दोन गट भिडले. तुफान दगडफेक करीत रस्ता रोको करण्यात आला. आमदार कांशीराम पावरा हे घटनास्थळी पोहचले, पण आदिवासी बांधवांना न भेटता आधी समोरच्या गटाला भेटल्याने संतप्त आदिवासिनी आमदारांची गाडी फोडून उलटी केली. तहसीलदार आणि पोलिसांच्या वाहनांवर देखील दगडफेक करीत त्यांचे नुकसान करण्यात आले. दुपारनंतर सुरू…

Read More

चांदसैली घाट एक महिना वाहतुकीसाठी राहणार बंद,जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आदेश

सातपुड्याच्या दुर्गम भागाला जोडणारा महत्वपूर्ण रस्ता म्हणून तळोदा- धडगाव रस्त्याची ओळख आहे.मात्र या रस्त्यात असलेल्या चांदसैली घाटात डोंगराळ परिसरात पावसामुळे किंवा भूसंखलनामुळे सदरच्या परिसरात घाटातून मोठ्या प्रमाणात दगड कोसळण्याची व माती रस्त्यावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भविष्यात वित्तीय किंवा जीवितहानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. यादृष्टीने हा मार्ग आता महिनाभर बंद राहणार…

Read More

भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी बबनराव चौधरी तर शहरजिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर

धुळे प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीणजिल्हाध्यक्ष पदी शिरपूरचे बबनराव चौधरी यांची तर शहरजिल्हाध्यक्ष म्हणून गजेंद्र अंपळकर यांची नियुक्ती झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांनी हि नियुक्ती केली.विद्यमान पदाधिकाऱ्यांचा संघटनात्मक कार्यकाळ पूर्ण झाल्याने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ह्या नियुक्त्या केल्या आहेत. धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हणून बबनराव यांची पुन्हा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे ….

Read More

अजित पवारांनी उपस्थित केला थेट शरद पवारांच्या निवृत्तीचा मुद्दा

कुठेही वय झाले की निवृत्ती घेतली जाते. राजकरण, शेती, उद्योग सर्वच क्षेत्रात हा प्रकार आहे. भाजपमध्ये लालकृष्ण आडवाणी यांनी निवृत्त घेतली होती. आता तुमचेही वय ८२ झाले आहे. तुम्ही कधी थांबणार आहात की नाही. आम्हाला आशीर्वाद द्या, आमचे कुठे चुकले तर सांगा ना. आपल्या घरातसुद्धा शेतकरी सांगतो, तू आता २५ वर्षांचा झाला. आता तू शेती…

Read More

मुंबईच्या वरळी सी फेसवर पोत्यात आढळला तरूणीचा मृतदेह,महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मीरा रोड येथील सरस्वती वैद्य आणि चर्चगेट येथील हॉस्टेलमध्ये तरुणीवर बलात्कार प्रकरणानंतर पुन्हा एका हत्याकांडाने मायानगरी मुंबई हादरली आहे. दक्षिण मुंबईतील वरळी समुद्रकिनारी गोणीत तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरुणीचे हात-पाय तोडलेले आहेत. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत तरुणीचे वय 18 ते 30 दरम्यान असल्याचे कळते….

Read More

नाशिक : पोलिसांच्या कारवाईचा बडगा,२५ टवाळखोर ताब्यात

सिडकोत 25 टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई.सिडको परिसरात वाढती गुन्हेगारी व टवाळखोरांवर कार्यवाही करण्यासाठी अंबड पोलिसांनी कंबर कसली असून सिडकोतील चौकाचौकात, उद्यानात तसेच मुख्य रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या टवाळखोरांवर अंबड पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.सोमवारी (ता. १२) सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत तब्बल २५ टवाळखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही महिन्यांपासून सिडको परिसरातील विविध भागात टवाळखोरांनी उपद्रव केला आहे. दिवसेंदिवस हाणामारी…

Read More

मशिदीत हनुमान चालीस करण्याची केली मागणी,त्र्यंबकेश्वर वादानंतर साधू-महंत आक्रमक

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्माच्या लोकांच्या जमावाने जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली होती. मात्र, मंदिराच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. या घटनेनंतर मंदिर समितीने तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. आता…

Read More

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठली, कायदेशीर अडथळे झाले दूर

यापूर्वी, 8 डिसेंबर 2022 रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून खंडपीठाने निर्णय राखून ठेवला होता.गेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारला विचारले होते की, जल्लीकट्टूसारख्या बैलावर नियंत्रण मिळवण्याच्या खेळात कोणत्याही प्राण्याचा वापर करता येईल का? यावर सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की, जल्लीकट्टू हे केवळ मनोरंजन नाही. उलट, हा एक मोठा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वाचा कार्यक्रम…

Read More

मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्याची परवानी द्या; दाम्पत्याची सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठणाची परवानगी द्यावी, अशी मागणी पुण्यातल्या एका दाम्पत्याने केली आहे. त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. आता यावर काय निर्णय येणार, याची उत्सुकता आहे. सध्या देशभरात मुस्लीम बांधवाच्या पवित्र अशा रमजान महिन्याचे उपवास सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल केल्याने तिचे महत्त्व आहे. अन्वर शेख आणि त्यांची…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना दिलासा,पुढील सुनावणी पर्यंत अटकेपासून संरक्षण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. ईडी अर्थातच अंमलबजावणी संचालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांना अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने दिलेत. त्यामुळे 27 एप्रिलपर्यंत मुश्रीफ यांना दिलासा मिळाल्याचे समजते.मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने पूर्वीच फेटाळला होता. त्यामुळे आगामी दोन आठवडे तरी अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी…

Read More
Back To Top