
रस्त्याच्या कडेला झोपलेल्या तिघांना चिरडले !
रस्त्याच्या कडेला थकून झोपलेल्या तीन मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना मंगळवार दि. ११ मार्च रोजी पहाटे जळगावमधील नशिराबादजवळ घडली. दिवसभर श्रम करून थकलेल्या या मजुरांनी फक्त काही तासांची विश्रांती घेतली, मात्र एका अज्ञात वाहनाने झोपलेल्या अवस्थेत त्यांना चिरडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. नशिराबादजवळील खुर्द गावात सध्या पुलाच्या कामासाठी अनेक परप्रांतीय मजूर काम करत आहेत….