धुळ्यात प्रवाश्याला लुटणाऱ्या चोरट्यास मुद्देमालासह केली अटक , धुळे तालुका पोलिसांची कामगिरी

नाशिकहून धुळे मार्गे जळगावकडे जाणाऱ्या प्रवाशास लुटणाऱ्या अट्टल चोरट्याला तालुका पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. वसिम उर्फ वड्या सलीम रंगरेज राहणार धुळे , असे ह्या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून मोबाइलसह ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तेजस महेंद्र सोनवणे रा. दापोरे जि . जळगाव हे आपल्या बलेरो कार ने नाशिकहून जळगावकडे जात असताना…

Read More

अक्कलपाडा पाटाची दुरुस्ती करा ! नेर ग्रामस्थांची मागणी

धुळे : अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीमध्ये जाणारा शिवकालीन रायवट फड पाट आणि पाटचाऱ्यांची स्थिती खूप खराब झाली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गळती होणे आणि खिडक्यांचा पूर्णपणे तुटलेला असणे, यामुळे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करताना अडचणी येत आहेत. या समस्या अनेक दिवसांपासून उपस्थित आहेत आणि त्या त्वरित दुरुस्त कराव्या अशी मागणी नेरचे माजी सरपंच, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव…

Read More

राज्यातील आश्रमशाळांची वेळ 11 ते 5 करा : जिल्हा भाजपा शिष्टमंडळाची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

राज्यातील आश्रमशाळांची वेळ सकाळी 8:45 ते 4 अशी आहे. सध्या कडाक्याचा थंडीने सारेच हैराण आहेत. ही वेळ अमानवीय असून विद्यार्थी, पालक व कर्मचारी यांना मानासिक तसेच शारिरीकदृष्ट्या आणि शालेय अध्ययन, अध्यापन दृष्टीने उचित नसून ती बदलविण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धुळे जिल्हा भाजपचे शिष्टमंडळ जिल्हाध्यक्ष बबनराव…

Read More

थाळनेरमध्ये होमगार्ड संघटनेच्या ७८ व्या वर्धानपन दिनानिमित्त सात दिवसाचे स्वछता अभियान

शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील निष्काम सेवेचे व्रत घेतलेल्या होमगार्ड संघटना स्थापनेला ७८ वर्ष पूर्ण झाल्याने होमगार्ड पथकाने ७ डिसेंबर ते १३ डिसेंबर, सात दिवस स्वच्छता अभियान राबवून सप्ताह उत्साहात साजरा केला. मुंबई राज्याचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी ६ डिसेंबर १९४६ रोजी प्रथम ‘नगरसेना ‘(होमगार्ड) या नावाने एका नव्या शिस्तप्रिय स्वयंसेवकांची संघटना स्थापन केली. सण,उत्सव,निवडणुका,…

Read More

अक्कलपाडा धरणातून पाणी सोडा : अकलाडच्या सरपंचांनी दिले निवेदन

धुळे : अक्कलपाडा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन सोडावे व पाणी वापर संस्थांना पाणीपट्टी भरण्याचे आदेश करावे असे निवेदन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी उपअभियंता के एस बांगर यांना अकलाडचे सरपंच अजय माळी व भदाण्याचे माजी सरपंच कृष्णा खताळ यांनी दिले. अजूनही पाटबंधारे विभागातर्फे पाणी वाटपाचे नियोजन तसेच वेळापत्रक जाहीर केले गेले नाही….

Read More

घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोंडाईचा पोलिसांची कारवाई

दोंडाईचा पोलसांनी घरफोडी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीवरून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली असता तिघांनी आणखी एका साथीदारासह दोंडाईचा शहरातील सिंधी कॉलनीत घरफोडी केल्याची कबुली दिली असून चोरी केलेला ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल काढून दिला आहे.दोंडाईचा शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी शंकर मनोहरलाल खत्री हे आपल्या परिवारासह दिल्ली येथे…

Read More

धुळ्याचे आ.अनुप अग्रवाल यांनी घेतली ना. नितीन गडकरी यांची भेट

धुळ्याचे नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांनी नागपूर अधिवेशन काळात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन धुळ्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत चर्चा करून निवेदन दिले. ज्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 पारोळा रोड चौफुली ते बाळापूर फागणे पर्यंतचा रस्ता चौपदरीकरण करण्याची विनंती केली. कारण हा रस्ता फागण्यापासून पुढे चौपदरी आहे….

Read More

पांझरा नदी पुलावर डीजे वाहन आणि दुचाकीचा अपघात ; दुचाकी चक्काचूर पण सुदैवाने जीवित हानी टळली

धुळे शहरातील नकाणे रोडलगत पांझरा नदी पुलावर डीजे वाहन एका दुचाकी वर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. बुधवारी, ४ डिसेंबर रोजी सायंकाळी हि घटना घडली. गाडीचा अचानक ब्रेक न लागल्याने ती जागेवरच पलटी झाली आणि दुचाकीचा चक्काचूर झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी डीजे वाहन आणि एक्टिवा दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे….

Read More

धुळ्यात थंडीचा जोर वाढला, स्वेटर खरेदी करणाऱ्यांची झाली गर्दी

धुळ्यात अचानक वातावरणात गारवा वाढलाय. थंडीने हुडहुडी भरतेय. तापमान साधारणतः १० डिग्री सेल्सिअस घसरले असून हे तापमान ८ ते ९ डिग्री सेल्सिअस पर्यंत घसरण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मागच्या वर्षीही धुळ्यातले तापमान ७ डिग्री सेल्सिअसच्या खाली गेले होते. हवेमध्ये प्रचंड गारवा निर्माण झाला असल्याने थंडीचा जोर आणखीच वाढलाय. वाढत्या थंडीमुळे रात्री लवकर शहरातील रस्ते निर्मनुष्य…

Read More

भाजपने ईव्हिम मशीनमध्‍ये घोळ केला;पराभूत उमेदवारांचा आरोप

राज्यभरात भाजपने मिळवलेल्या भरभरून यशावर शंका उपस्थित केल्या जात आहेत. सत्तेचा गैरवापर करत भाजपने ईव्हीएम प्रणालीत घाेळ केल्यामुळेच शिरपूर मतदारसंघात त्यांना हे यश मिळाल्याचा आराेप उमेवार गितांजली कोळी यांनी केला आहे.साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात आयोजित पत्रकार परिषदेत गितांजली कोळी यांनी सांगितले की, गावातून तुम्हाला मतदान कसे पडले नाही म्हणून अनेक फोन…

Read More
Back To Top