शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
साक्री शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. काल 19 मार्च रोजी साक्री तालुक्यातील अंबापुर, पेरेजपुर, अष्टाने ,कावठे ,कासारे, बेहेड ,व परिसरातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने झोडपली आहे. गारपिटीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर ऐन पीक काढणीच्या वेळेस मोठे संकट आले असून गहू, कांदा हरभरा, आंबा, आदी फळबाग व पिका॓चे पूर्णपणे नुकसान झाले आहे . शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. या पार्श्वभूमीवर साक्री तहसीलदारांना निवेदन देण्यात आले .
( प्रतिनिधी : निलेश सावळे )

