
राजकीय

सरकार व्हेंटिलेटरवर, राज्यपालांची गच्छंती अटळ – संजय राऊत यांच दावा
राज्य सरकार व्हेंटिलेटरवर असून, त्यात दोन उभे गट पडले आहेत. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय, राज्यपाल लवकरच जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संजय राऊत हे सद्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली.पुढे ते म्हणाले की,…

भाजपचे नेते तेजिंदर तिवाना यांना मारून टाकण्याची धमकी
मुंबई : भाजपचे नेते तेजिंदर तिवाना यांना जिव्हे मारून टाकण्याची धमकी मिळाली आहे. बांगूर नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका अज्ञात व्यक्तीच्या शोधात आहेत ज्याने मुंबईचे भाजप युवा शाखा प्रमुख तेजिंदर तिवाना आणि त्यांच्या सोबतच कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या व्यक्तीने एका संदेशात दावा केला की ते भाजप, आरएसएस मंत्री…

शिवसेना नाशिक मधील कार्यकर्त्यांच्या शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने संजय राऊतांनी केली टीका
नाशिक : शिवसेनेचे काही पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. या प्रवेशा मुळे आज एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावरती आहेत. पक्षप्रवेशावरती ठाकरे गटातील नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शिंदे गटात जे गेले त्यांची नावे कोणालाही माहिती नाही आहे. ते आज नाशिक दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना म्हणाले “शिवसेनेत न दोन-चार दलाल, ठेकेदार गेले असतील….

आंबेडकरांसोबत आल्यास राज्यासह देशात परिवर्तन दिसेल,प्रकाश आंबेडकर – शिवसेना युतीवर संजय राऊत यांचे वक्तव्य
मुंबई : प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना यांच्यात युतीची चर्चा सुरू आहे. ठाकरे आणि आंबेडकर ही एक ताकद आहे. ही ताकद जर एकत्र आली तर राज्याचंच नव्हे तर देशाचं राजकारण बदललेलं दिसेल, अशी प्रतिक्रिया आंबेडकर-ठाकरे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर आधारित कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर एकाच…

भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
नाशिक : पिंपरी-चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते ५९ वर्षांचे होते. लक्ष्मण जगताप हे लढवय्ये नेते होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना आजाराने गाठलं होत. आज अखेर त्यांच उपचारादरम्यान निधन झालं. पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाचे नेते म्हणून…

संभाजीराजे का झाले अजित पवारांवर आक्रमक
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावरून भाजपने राज्यभरात रान पेटवल्यानंतर आज स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संभाजीराजे आज माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘मी संभाजीमहाराज यांना स्वराज्यवीर, धर्मवीर असं नेहमीच…

‘ठाकरे-आंबेडकर एकत्र आले तरी फरक पडणार नाही’; रामदास आठवलेंचा टोला
भीमशक्ती आमच्या पाठीशी असल्याने उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तरी ही काही फरक पडणार नाही. ठाकरे, आंबेडकर एकत्र आले तरी कॉंग्रेस -राष्ट्रवादी यांच्यामध्ये जागा वाटपावरुन मतभेद होतील. त्यामुळे आघाडीत बिघाडी व्हायला वेळ लागणार नाही, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लावला आहे. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि…

“…तर कसबा पोटनिवडणूक लढवणार”; NCP च्या रुपाली पाटील-ठोंबरेंचं विधान! म्हणाल्या,
पुणे :येथे कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार, माजी महापौर मुक्ता टिळक यांचे गुरुवारी निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठीच्या पोटनिवडणुकीची चर्चा पुण्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरेंनी या जागेवरुन पोटनिवडणूक लढण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. मुक्ता टिळक यांच्यासाठीच २०१९ साली अगदी ऐनवेळी आपलं तिकीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कापलं होतं असंही…

इतके बदलले आमचे फडणवीस ?” संजय राऊतांचा जबरदस्त टोला; बोलले, “ देवेंद्रजी आपला पूर्वेतिहास…!,
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून जोरदार खडाजंगी बगायला मिळत आहे. आज राज्य सरकार विधिमंडळात सीमाप्रश्नावर ठराव मांडणार असल्यामुळे त्यावरून राजकीय वातावरण जबरदस्त पणे तापले आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमाशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. “विरोधकांचे बॉम्बस्फोट नसून लवंगी फटाकेही नव्हते, आमच्याजवळ ही भरपूर बॉम्ब आहेत”, असं फडणवीसांनी…