धुळे, ५ जून : पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हद्दीत ३० मे रोजी घडलेल्या विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे. यामध्ये पतीसह कुटुंबीयांनी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून अखेर सुपारी देऊन तिचा खून केल्याचे समोर आले असून एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे.भुषण शिवाजी महाजन (वय ३५, रा. भडगाव, जि. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १९५/२०२५ अन्वये IPC कलम १०३(१), ८५, ११५(२), ३५१(२)(३), ३५२, ४९, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.मयत शारदा उर्फ पूजा कपिल बागुल (वय ३८, माहेर भडगाव) हिचा पती कपिल बागुल, सासरे बाळु बागुल, सासू विजया बागुल, व नणंद रंजना माळी यांनी प्लॉटसाठी माहेरून २ लाख रुपये आणावेत म्हणून तिचा छळ केला होता. शिवाय, कपिल बागुलचे प्रज्ञा कर्डीले हिच्याशी असलेल्या अनैतिक संबंधांना शारदाने विरोध केल्यामुळेच तिचा खून करण्यात आला, असे तक्रारीत नमूद आहे.सुपारी देऊन खून – गुन्ह्याचा धक्कादायक तपशीलतपासादरम्यान कपिल बागुल व त्याचे कुटुंबीय हे मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यासह प्रज्ञा कर्डीले हिनेही कटात सहभाग घेतल्याचे समोर आले. त्यांनी सुपारी देऊन शारदाचा खून केल्याची कबुली दिली.या हत्येसाठी खालील आरोपींना सुपारी देण्यात आली होती:भुषण बापु काळे (२०)यश उर्फ जयेश जगताप (१९)सचिन उर्फ बब्या जाधव (३५)साई उर्फ आकाश माळीतसेच एक विधीसंघर्षग्रस्त बालकया प्रकरणातील सर्व आरोपी जुने धुळे येथील बर्फ कारखान्याजवळचे रहिवासी आहेत.पोलिसांनी यातील चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र, साई उर्फ आकाश माळी हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे
