बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलिसांनी मोठी खबरदारी घेतली आहे. गोवंश जनावरांची क्रूरपणे वाहतूक करून त्यांना त्रास देणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कठोर कारवाई करत ४ आरोपींना एका वर्षासाठी जिल्ह्याबाहेर हद्दपार (तडीपार) केलं आहे. तसेच ८ संशयित आरोपींना ४ दिवसांसाठी धुळे शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
गोवंश जनावरांची निर्दय वाहतूक करून त्यांना कत्तलीसाठी नेणाऱ्या टोळीतील पुढील चार जणांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे:
१) जाकीर हुसैन अब्दुल मजिद तेली – आदर्शनगर, शिरपूर (टोळी प्रमुख)
२) बल्लु मजीद तेली – आदर्शनगर, शिरपूर
३) इमरान खान अय्युब खान – कब्रस्तानजवळ, शिरपूर
४) शारुख शरीफ तेली – लोहार गल्ली, शिरपूर
या आरोपींविरुद्ध शिरपूर शहर, आझादनगर व नरडाणा पोलीस ठाण्यांमध्ये जनावरांवरील क्रूरतेचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या कृत्यामुळे जिल्ह्यातील शांतता बिघडत असल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी त्यांना एक वर्षासाठी जिल्ह्याबाहेर पाठवले आहे. ही टोळी अमळनेर (जि. जळगाव) पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोडण्यात आली आहे.
बकरी ईदच्या दिवशी गोवंश जनावरे आणून त्यांची बेकायदेशीर कत्तल होऊ नये म्हणून पुढील आठ आरोपींना ६ जून सकाळी ८ ते ९ जून रात्री १२ वाजेपर्यंत शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे:
१) नियाज अहमद अन्सारी
२) अबरार अहमद सत्तार
३) मोहम्मद शाबान अन्सारी
४) मोहम्मद जुनैद अन्सारी
५) मोहम्मद कलीम कुरेशी
६) सलमान अन्सारी
७) जाकीर उर्फ जाकीर काल्या
८) शेख जावेद अजीज
या आदेशामुळे या व्यक्तींना दिलेल्या काळात शहरात येण्याची परवानगी नसेल. जर त्यांनी हा आदेश मोडला, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, तसेच आझादनगरचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, शिरपूर उपविभाग, स्थानीय गुन्हे शाखा यांच्याद्वारे केली गेली. यामध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.