
महाराष्ट्र शासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल: माध्यमांतील बातम्यांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी परिपत्रक जारी
मुंबई, दि. 28 मार्च – राज्यातील नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या शासनविषयक बातम्यांची त्वरित दखल घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याद्वारे प्रशासनाची कार्यक्षमता वाढवून नागरिकांना चांगल्या सेवा देण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव आणि महासंचालक ब्रिजेश…