धावत्या बसमध्ये महिलेची प्रसूती

नाशिकहून नंदुरबारकडे निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एक आदिवासी महिलेची प्रसूती झाली. ही घटना बुधवारी २५ डिसेंबर रोजी सटाणा रस्त्यावर घडली. बसचालक, महिला वाहक, पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाश्यांच्या मदतीने महिला आणि तिच्या बाळाला सटाणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, आणि दोघेही सुखरूप आहेत. बागलाण तालुक्यातील वडे दिगर येथील अजित पवार आणि त्यांची पत्नी पूजाबाई…

Read More

अक्कलपाडा पाटाची दुरुस्ती करा ! नेर ग्रामस्थांची मागणी

धुळे : अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीमध्ये जाणारा शिवकालीन रायवट फड पाट आणि पाटचाऱ्यांची स्थिती खूप खराब झाली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गळती होणे आणि खिडक्यांचा पूर्णपणे तुटलेला असणे, यामुळे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करताना अडचणी येत आहेत. या समस्या अनेक दिवसांपासून उपस्थित आहेत आणि त्या त्वरित दुरुस्त कराव्या अशी मागणी नेरचे माजी सरपंच, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव…

Read More

राज्यातील आश्रमशाळांची वेळ 11 ते 5 करा : जिल्हा भाजपा शिष्टमंडळाची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

राज्यातील आश्रमशाळांची वेळ सकाळी 8:45 ते 4 अशी आहे. सध्या कडाक्याचा थंडीने सारेच हैराण आहेत. ही वेळ अमानवीय असून विद्यार्थी, पालक व कर्मचारी यांना मानासिक तसेच शारिरीकदृष्ट्या आणि शालेय अध्ययन, अध्यापन दृष्टीने उचित नसून ती बदलविण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धुळे जिल्हा भाजपचे शिष्टमंडळ जिल्हाध्यक्ष बबनराव…

Read More

थाळनेरमध्ये होमगार्ड संघटनेच्या ७८ व्या वर्धानपन दिनानिमित्त सात दिवसाचे स्वछता अभियान

शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील निष्काम सेवेचे व्रत घेतलेल्या होमगार्ड संघटना स्थापनेला ७८ वर्ष पूर्ण झाल्याने होमगार्ड पथकाने ७ डिसेंबर ते १३ डिसेंबर, सात दिवस स्वच्छता अभियान राबवून सप्ताह उत्साहात साजरा केला. मुंबई राज्याचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी ६ डिसेंबर १९४६ रोजी प्रथम ‘नगरसेना ‘(होमगार्ड) या नावाने एका नव्या शिस्तप्रिय स्वयंसेवकांची संघटना स्थापन केली. सण,उत्सव,निवडणुका,…

Read More

अक्कलपाडा धरणातून पाणी सोडा : अकलाडच्या सरपंचांनी दिले निवेदन

धुळे : अक्कलपाडा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन सोडावे व पाणी वापर संस्थांना पाणीपट्टी भरण्याचे आदेश करावे असे निवेदन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी उपअभियंता के एस बांगर यांना अकलाडचे सरपंच अजय माळी व भदाण्याचे माजी सरपंच कृष्णा खताळ यांनी दिले. अजूनही पाटबंधारे विभागातर्फे पाणी वाटपाचे नियोजन तसेच वेळापत्रक जाहीर केले गेले नाही….

Read More

घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोंडाईचा पोलिसांची कारवाई

दोंडाईचा पोलसांनी घरफोडी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीवरून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली असता तिघांनी आणखी एका साथीदारासह दोंडाईचा शहरातील सिंधी कॉलनीत घरफोडी केल्याची कबुली दिली असून चोरी केलेला ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल काढून दिला आहे.दोंडाईचा शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी शंकर मनोहरलाल खत्री हे आपल्या परिवारासह दिल्ली येथे…

Read More

धुळ्याचे आ.अनुप अग्रवाल यांनी घेतली ना. नितीन गडकरी यांची भेट

धुळ्याचे नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांनी नागपूर अधिवेशन काळात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन धुळ्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत चर्चा करून निवेदन दिले. ज्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 पारोळा रोड चौफुली ते बाळापूर फागणे पर्यंतचा रस्ता चौपदरीकरण करण्याची विनंती केली. कारण हा रस्ता फागण्यापासून पुढे चौपदरी आहे….

Read More

शरद पवार आणि राहुल गांधी करणार मारकडवाडीतुन ईव्हीएमविरोधात लाँगमार्च

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीयेथे भाजपचे राम सातपुते हे निवडून आले. यावर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. राष्ट्रवादीचे जानकर आणि मोहिते पाटील यांनाच मताधिक्य देण्याचा गावकऱ्यांचा दावा असल्याने त्यांनी ई व्ही एमवर संशय दाखवीत पुन्हा मतदान घेण्याचा आग्रह केला. प्रशासनाने नकार दिल्यावर सुद्धा मारकडवाडीतील नागरिकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे ठरवून तशी तयारीही केली. मतदान पेट्या,…

Read More

पांझरा नदी पुलावर डीजे वाहन आणि दुचाकीचा अपघात ; दुचाकी चक्काचूर पण सुदैवाने जीवित हानी टळली

धुळे शहरातील नकाणे रोडलगत पांझरा नदी पुलावर डीजे वाहन एका दुचाकी वर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. बुधवारी, ४ डिसेंबर रोजी सायंकाळी हि घटना घडली. गाडीचा अचानक ब्रेक न लागल्याने ती जागेवरच पलटी झाली आणि दुचाकीचा चक्काचूर झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी डीजे वाहन आणि एक्टिवा दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे….

Read More

अपघातानंतर अटक न करण्यासाठी मागितली लाच ; एक हवालदार ताब्यात एक फरार

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे दोन दुचाकीस्वरांच्या झालेल्या अपघातात एकाने जीव गमावला. दुसऱ्या दुचाकीस्वारांवर घुंह नोंदविण्यात येत असताना २ पोलीस हवालदारांनी त्यांच्याकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून एका पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडण्यात आले असून दुसरे फरार झालेत. तक्रारदार हे दि. 7 नोव्हेंबर रोजी मोटार सायकल ने पारोळा ते धरणगाव रस्त्यावर…

Read More
Back To Top