
महाराष्ट्र

साक्री पिंपळनेर रोडवरील भागड्या डोंगराला आग; निसर्गसंपत्तीचा मोठा विध्वंस
धुळे | साक्री-पिंपळनेर रोडवरील मालपूर कासारे फाट्याजवळ असलेल्या भागड्या डोंगराला आज दुपारी अचानक आग लागली. झाडे आणि गवताला लागलेल्या या आगीत डोंगरावरील व डोंगराखालील मोठ्या प्रमाणावर वनस्पती जळून खाक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या ही आग अधिकाधिक पसरत असून, स्थानिक निसर्गप्रेमी व पर्यावरण कार्यकर्त्यांनी त्वरित याची दखल घेण्याचे आवाहन केले आहे. अद्याप या आगीचे…

तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी, साठ फेलोंची निवड करण्यात येणार
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर मुंबई – राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” २०२५-२६…
धुळे तालुक्यातील सरपंच पदासाठी सोमवारीआरक्षण सोडत
धुळे तालुक्यातील अनुसुचीत क्षेत्रातील ग्रामपंचायती वगळून इतर सर्व ग्रामपंचायती करीता अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग करीता सन 2025-2030 या कालावधीसाठी ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोमवार, 7 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय, धुळे ग्रामिण येथे आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती तहसिलदार (ग्रामिण) अरुण शेवाळे यांनी एका…

नटराज टॉकीजजवळील भंगार गोडाऊनला भीषण आग
धुळे: नटराज टॉकीज लगत असलेल्या अन्सारी पुठ्ठा भंगार दुकानास अचानक आग लागल्याने संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. अधिक तपास प्रशासनाकडून सुरू आहे. -प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

साक्रीत गुढीपाडवा व हिंदू नववर्षानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन
गुढीपाडवा व हिंदू नववर्षदिनानिमित्त श्रीराम मंदिर संस्थान साक्री, हिंदू जनजागरण समिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेत शहरातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम मंदिर येथील नवीन ध्वज पूजनाने झाली. संस्थानचे अध्यक्ष श्रीकांतभाई भोसले आणि विजय भोसले यांच्या हस्ते हा विधी पार पडला. यानंतर श्रीराम…

महाराष्ट्र शासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल: माध्यमांतील बातम्यांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी परिपत्रक जारी
मुंबई, दि. 28 मार्च – राज्यातील नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या शासनविषयक बातम्यांची त्वरित दखल घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याद्वारे प्रशासनाची कार्यक्षमता वाढवून नागरिकांना चांगल्या सेवा देण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव आणि महासंचालक ब्रिजेश…

राज्यातील ५६० गोशाळांना २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण
मुंबई, दि. २८: राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेअंतर्गत २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अनुदानाचे वितरण करण्यात आले. या योजनेतर्गत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचे अनुदान गोशाळांना देण्यात आले आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्यातील ५६० गोशाळांमधील ५६ हजार…

सिल्लोडमध्ये अमानुष अत्याचार; दत्तक घेतलेल्या 4 वर्षांच्या चिमुरडीची हत्या
छत्रपती संभाजीनगर: सिल्लोड तालुक्यातील मुगलपुरा परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. दत्तक घेतलेल्या मुलीची हालहाल करून हत्या –प्राथमिक माहितीनुसार, हत्या झालेल्या मुलीचे नाव आयत फईम शेख असे असून, तिला…

धुळ्यात हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या शोभायात्रेचे भव्य आयोजन
धुळे : विश्व हिंदू परिषद आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने रविवार, 30 मार्च 2025 रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रा ग्रामदैवत श्री एकविरा माता मंदिर येथून सकाळी आठ वाजता प्रारंभ होणार आहे. हिंदू नववर्ष स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने दररोज विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील प्रभावशाली मठ, मंदिर आणि व्यायामशाळा…

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क हटवले; शेतकऱ्यांना दिलासा
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील २० टक्के निर्यात शुल्क पूर्णतः हटवले असून, त्यामुळे कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड झाली असून पोषक हवामानामुळे उत्पादनही जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचे दर घसरण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत होती. त्यानुसार, राज्य सरकारच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याचे पणन मंत्री…