शिरपूरमध्ये पत्रकार सेवा संघाचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

पत्रकार सेवा संघ (महाराष्ट्र राज्य) शिरपूर तर्फे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२५ काल २४ ऑगस्ट रविवारी कालिदास वैद्य नगर, खरदे येथील श्री लक्ष्मी लॉन्स येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात शिरपूर शहर व तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच एम.पी.एस.सी. आणि यू.पी.एस.सी. मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात…

Read More

शिरपूर तालुक्यातील नव्या आढे गावात हाणामारी; ३ जखमी, १२ जणांना अटक

धुळे- शिरपूर तालुक्यातील नवे आढे गावात दोन गटात हाणामारी झाली . यात ३ जण जखमी झाले तर १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सैन्यदलात असलेल्या सुनील कोकट पारधी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास नवे आढे गाव येथे येऊन जमावाने त्यांना व त्यांच्या साथीदारांना लाठ्या, काठ्या, चाकूने मारहाण केली. यात…

Read More

शासनमान्य जागेवर अतिक्रमण करून डॉ. आंबेडकर स्मारकाचा अवमान; अतिक्रमण हटविण्याची मागणी

साक्री तालुक्यातील जैताणे येथील निजामपूर–जैताणे व वासखेडी रस्त्याच्या त्रिवेणी संगमावर शासनमान्य जागेवर उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा स्मारकाच्या जागेवर अज्ञात इसमांनी बेकायदेशीर अतिक्रमण केल्याची बाब उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर जागा बांधकाम विभाग मालकीची असून 1987 ते 1989 या कालावधीत वेळोवेळी पाठपुरावा करून पुतळ्यासाठी मंजुरी मिळवण्यात आली होती. याच जागेवर 1989…

Read More

पोळ्याच्या सणालाच काळाचा घाला; धुळे तालुक्यातील अर्णी शिवारात सर्पदंशाने बैलाचा मृत्यू

शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर, शासनाने तातडीने मदत देण्याची ग्रामस्थांची मागणी एकीकडे राज्यभर पोळा सण उत्साहात साजरा होत असताना, शेतकऱ्याच्या जीवनातील सोबती असलेल्या बैलाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याने धुळे तालुक्यातील वरखेडी गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी विलास संतोष धनगर हे आपल्या बैलाला पोळा सणानिमित्त वरखेडी शिवारातील ‘आर्णी’ येथे अंघोळ घालण्यासाठी घेऊन गेले होते. बैलाला स्वच्छ…

Read More

‘नवरंग’च्या जागेवर सहा महिन्यांत उभारणार २५० ओट्यांचे भाजी मार्केट- आ. अनुप अग्रवाल

धुळे शहरातील देवपूरमधील दत्तमंदिर ते नगावबारीपर्यंत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यासाठी नवरंग जलकुंभाजवळ भाजी मंडई उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी २०० ते २५० ओटे शेड स्वरूपात तयार करण्यात येणार असून सहा महिन्यांत हा प्रकल्प उभा राहील, अशी माहिती शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली. महापालिकेच्या प्रशासकीय महासभेत आयुक्त…

Read More

धुळ्यात आपला ‘श्री गणेश उत्सव, आपली संस्कृती’ मोहिमेचे लोगोचे उद्घाटन

धुळे : गणेशोत्सवाला मूळ संस्कृतीकडे वळवण्यासाठी ‘आपला श्री गणेश उत्सव, आपली संस्कृती’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या बोधचिन्हांचे (लोगो) विमोचन धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मा. सौ. भाग्यश्री विसपुते आणि महानगरपालिका आयुक्त मा. अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जनतेला संघटित करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. मात्र, सध्याच्या काळात…

Read More

धुळ्यातील आई मरिमाता गणेश मंडळाच्या गणेश उत्सव 2025 सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न

धुळ्यातील पेठभागातील प्रमुख मंडळांपैकी एक असलेल्या शिवनेरी चौकातील आई मरिमाता गणेश मंडळा तर्फे गणपती उत्सव 2025 साठी उभारण्यात येणाऱ्या भव्य सभामंडपाचे भूमिपूजन आज २१ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्यास आझाद नगरचे पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार, प्रख्यात वैद्यकीय तज्ञ डॉ. विनोद छाजेड, डॉ. डी. वाय. महाजन, डॉ. भूषण राव, तसेच पेठभागातील मान्यवर व्यापारी…

Read More

जळगाव जिल्ह्यात शोककळा : एका कुटुंबातील पाच जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील वरखेडे गावात घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. शेतात लावलेल्या विजेच्या तारेच्या कुंपणामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असून, दीड वर्षांची एक मुलगी मात्र सुदैवाने बचावली आहे. घटना कशी घडली? मध्यप्रदेशातील विकास रामलाल पावरा (३५) हे कुटुंबासह रोजगारासाठी एरंडोल तालुक्यात आले होते. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास…

Read More

पाचव्या दिवशी आमरण आंदोलकांचे सामुदायिक मुंडन; मागण्या मंजूर होईपर्यंत आंदोलन कायम

कापडणे – कापडणे शुद्ध पाणीपुरवठा संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस असूनही ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित जलजीवन प्राधिकरणाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आंदोलकांनी सामुदायिक मुंडन करून जाहीर निषेध व्यक्त केला. गावात 15 जुलैपासून विविध पद्धतीने आंदोलन सुरू आहे. मात्र प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने 16 ऑगस्टपासून भुषण ब्राम्हणे, ज्ञानेश्वर भामरे, विशाल…

Read More

तापी नदीकाठी राहणाऱ्यांसाठी प्रशासनाचा इशारा : धरणातून वाढलेला विसर्ग

धुळे/नंदुरबार – तातडीची सूचना म्हणून प्रशासनाने तापी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज दुपारी बारा वाजता हतनूर धरणातून एक लाख सत्तावन्न हजार तीनशे नव्याण्णव क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग तापी नदीत सोडण्यात आला आहे. पुढील काही तासांत हा विसर्ग एक लाख पंचाहत्तर हजार क्यूसेकपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या सारंगखेडा बॅरेजमधून एक लाख…

Read More
Back To Top