बैलगाडीसह शेतकऱ्यांचा महामार्ग चक्काजाम आंदोलन; कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचा आक्रमक इशारा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने महामार्गावर तीव्र आंदोलन छेडण्यात आले. माजी मंत्री व शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेवाळी फाटा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा (मुंबई-आग्रा) वर बैलगाड्यांसह शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आणि घोषणाबाजी करत आंदोलन छेडले. सातबारा कोरा करण्याचं आश्वासन हवेत:2024 च्या…
